१३ एप्रिल २०१८

अपर्णा रामतीर्थकर यांची व्हायरल पोस्ट आणि त्यावरील आक्षेप



आईने मुलीला सासरी जाताना दिलेले सल्ले वजा उपदेश असलेली पोस्ट ही अपर्णा रामतीर्थकर यांच्या भाषणाने प्रभावित आहे. स्त्री शिक्षणाचा जोरदार विरोध करणाऱ्या या कथित समाजसेविकांचा विरोधाभास हा की त्यांनी स्वतः वकिलीचे शिक्षण घेतले आहेत आणि तरिही मुलींच्या शिक्षणाला विरोध करुन त्या स्वतःतीलच दांभिकपणा दाखवत आहेत.

या पोस्टची सुरुवात ज्या पद्धतीने केली आहे त्यामुळे अनेकदा पीडित भूमिकेत असलेल्या प्रत्येकाला पोस्टची सुरुवात वाचून तो विचार पटतो. कारण प्रत्येकाचे स्वतःचे म्हणून काही अनुभव असू शकतात, मात्र कधी कधी अशा व्यक्तींना आपले अनुभव हे सार्वत्रिक असल्याचाही गैरसमज होतो. त्यातूनच मग अशा मांडणीवर विश्वास ठेवायला सुरुवात होते. खरंतर प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रेमाने, समजूतदारपणे वागावे हे शाश्वत आणि वैश्विक मूल्य आहे, पण जेव्हा हे वागणं फक्त महिलांवर बंधनकारक करत पुरुषांना यातून सूट दिली जाते, तेव्हा त्यातून सोयीस्करपणे आणि कदाचित नियोजनबद्ध पद्धतीने पुरुषप्रधान संस्कृतीला पाठबळ देण्याचा प्रयत्न होतो.
सध्या पालक आणि पाल्य या नात्यात पिढीतील अंतर आणि त्यांच्या अनुभव विश्वांमध्ये गतीने होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभुमीवर एक विचार (मार्गदर्शक दिशा) सांगितला जातो. तो म्हणजे पाल्यांचे दिशादर्शक (मार्गदर्शक) व्हा, त्यांचे नियंत्रक होऊ नका. या तत्वाचा विचार केला की मग साचेबद्ध उत्तर न देता त्यावर आपला दृष्टिकोन शांतपणे आणि संयमाने ठेवा आणि अट्टाहास न करता तो दृष्टीकोन स्वीकारायचा की नाही हा निर्णय समोरच्या व्यक्तीला घेऊ द्यात हा दृष्टिकोन मिळतो. मात्र या पोस्टमध्ये अपर्णा रामतिर्थकर अगदी साचेबद्ध आणि सर्व आजारांचा रामबाण उपाय अशा जाहिराती थाटात सुनेने (स्त्रीने) कसे वागावे असा उपदेश देत आहेत. जे आक्षेपार्ह आणि चुकीचे आहे, असे मला वाटते. त्यामुळे अशा स्वरूपाच्या साचेबद्ध आणि सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच सांगणाऱ्या लिंगभेदी पोस्टवर गांभीर्याने विचार करुन या पोस्ट सकारण नाकारायला हव्यात.

मुलीला तिचं घर कोणतं हा उपदेश देत या पोस्टची सुरुवात होते. हे सांगताना लिहिणाऱ्याच्या विचारप्रणालीत पुरुषप्रधानतेची बीजं किती खोलवर रुजली आहेत याचं स्पष्टपणे दर्शन होतं. कोणत्याही माणसाला (स्त्री-पुरुष) आपले लहानपण जेथे गेले त्या जागेशी काही जैविक व भावनिक नाते असते. ते सोडून जाण्याची भावना काय असते हे कदाचित आपल्याला विस्थापितांच्या अनुभवातूनही समजू शकेल. पण आयुष्याच्या एक महत्वाच्या टप्प्यावर अशापद्धतीने स्वतःचं मूळ सोडून दुसऱ्या ठिकाणी जाताना मानसिकपातळीवर काय घालमेल होते हे देखील समजून घेणं आवश्यक ठरते. ज्यावेळी मुलींना आपण जेथे लहानाचे मोठे झालो, ज्या माणसांनी आपल्याला जीवापाड प्रेम करत मोठे केले असे आपले माहेरचे ठिकाण आपले नाहीच असे सांगण्याचा प्रयत्न होतो तेव्हा हा फारच क्रूर आणि स्वार्थीपणाचा मानवी व्यवहार म्हणावा लागेल. यातील स्वार्थीपणा हा पुरुषसत्ताक व्यवस्थेचे समर्थन करणारा व त्याला अधिक बळकटी देणारा असतो. 

पुरुषप्रधान संस्कृतीत मुलीने स्वतःचं घर सोडून सासरी जाणे हे अपेक्षित असते आणि त्याबद्दल कुणालाही काहीही घेणेदेणे नसते, त्यामुळे संवेदनशीलपणे ते संक्रमण समजून घेण्याचीही तसदी कोणाकडून दाखवली जात नाही. त्यामुळे  सासर हेच यापुढे तुझे स्वतःचे घर आहे आणि यापुढे तु आमच्या घरी पाहुणी म्हणुन आहेस, त्यामुळे यापुढे आमच्याशी वागताना पाहुण्यासारखीच वाग, असे सांगणे. तसेच यापुढे जाऊन आता लग्न होऊन ज्या घरी जाते आहेस तेथेच तुझं मरण झालं पाहिजे. जगली तरी सासरी आणि मेलीस तरी सासरी हा जाणीवपूर्वक संस्कार (propoganda) रुजवला जातो. याला माझा व्यक्तिगत विरोध आहे.

मालिका बघण्याबाबत माझे व्यक्तिगत काही आक्षेप आहेत, पण हे आक्षेप रामतीर्थकर यांच्या सारख्या एकेरी हाक मारू नये छाप अर्थहीन आक्षेपांसारखे नाही. कारण अनेकवचनी हाक मारल्यावर अगदी माणुसपणाचे सर्व संस्कार होतात हा माझा भ्रम नाही आणि ज्यांचा आहे त्यांनी तो दुरुस्त करावा असेच माझे स्पष्ट मत आहे. त्याचं कारण हा एकेरीपणा एकमेकांच्या विश्वासातून आणि मैत्रीपूर्ण नात्यातून येतो. आणि हा टप्पा कथित सन्मानाच्या नाटकी वागण्यापेक्षा खूप महत्त्वाचा आहे. जेथे प्रत्येकजण वयाचे दडपण न घेता व्यक्त होतो. त्या व्यक्त होण्यात प्रचंड प्रेम आणि आदर असतो, जो नाटकी अथवा सामाजिक दाबावातून न येता मनातून आलेला असतो. याचं उदाहरण द्यायचं ठरलं तर तिर्थकरांना पटेल असं आईचं उदाहरण आहेच. त्यांनी त्यावर विचार करावाच.

जॉब-करीअर या महत्वाच्या गोष्टींना फालतु म्हणणे म्हणजे टोकच झाले. त्यापुढे जाऊन पैसा कमविण्यासाठी घराचा उंबरठा न ओलांडण्याचा सल्ला म्हणजे वास्तव नाकारत स्वतःच्याच कोशात राहणे आहे. आज पैसे ही आयुष्यातील सर्वस्व नसली तरी जगण्यासाठी (महिलांसाठी तर सन्मानाने जगण्यासाठी) अत्यावश्यक बाब झाली आहे. त्यामुळे नोकरी, पैसे याचं किमान महत्वही नाकारणे हा शुद्ध मूर्खपणा आहे.
तिर्थकरांचं महत्वाचं वेगळेपण म्हणजे त्या ज्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात त्यातून त्या अजूनही बाहेर पडलेल्या नाहीत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांना त्यांच्या नवऱ्याने कधीही प्रेमाने बाहेर फिरायला जायचे का असे विचारले नाही. त्यामुळे तसे विचारुच नये असा आट्टाहास त्या करतात. दैनंदिन जगण्यात काही नाविन्य शोधत जगण्याचा आनंद घेण्याशी या वकिल बाईंचा दुरान्वये देखील संबंध न आल्याने हे असे होत असावे असे मला वाटते.

'लग्नाच्या वरातीत भर रस्त्यावर चारचौघात नाचु नकोस, त्यामुळे माहेरच्या नावाला काळिमा लागेल', हा तर गमतीशीरच सल्ला. हा सल्ला देण्यामागे नाचणे (नृत्य) वाईट असते, त्यात चारचौघात नाचणे तर जास्त वाईट अशी काही गृहीतके असल्याचे लक्षात येते आणि त्यांची नृत्याविषयीची संकुचित समज व दृष्टिकोनही कळतो. पण यासर्वात त्या दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या आपल्या वंशाच्या दिव्याबद्दल मात्र काहीही आक्षेप घेत नाही. दुसरीकडे घरातल्याच लग्नाच्या वेळी महिलांनी गाण्यावर नाचणे म्हणजे यांना माहेरच्या नावाला काळिमा फासणे वाटते. काय काय केल्यावर आईच्या, वडिलांच्या व माहेरच्या नावाला काळिमा फासला जातो याबद्दलची तिर्थकरांची यादी तशी मोठी आहे. एकूणच संस्कृती रक्षण आणि कुटुंब बचावच्या बेगडी कामात त्यांना या यादीचा काहीसा फायदा होईलही, पण उत्क्रांतीच्या टप्प्यावर त्यांची ही यादी त्यांच्यातील उत्क्रांतीचा अभावच अधोरेखित करते.

"घराबाहेर पडताना लेगिन, जिन्स, टी-शर्ट असे कपडे वापरणं बंद कर व तसे कपडे घालुन फिरण्याचा अट्टाहास करु नकोस", असाही सल्ला त्या देतात. त्यांच्या मते यामुळेही कदाचित संस्कृती व कुटुंब धोक्यात आले असावे , त्यामुळे अशा सल्ल्यांवर येणारी पिढी हसण्यापलिकडे काही करेल असे वाटत नाही.

तिर्थकर यांच्या म्हणण्यानुसार अशा गोष्टी जर प्रत्येक आईने आपापल्या मुलीला मनापासून शिकवायला सुरुवात केली, तर कोर्टात व पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या पती-पत्नींमधील खटल्यांची व तक्रारींची संख्या कमी होईल. एकूणच त्यांच्या मांडणीचा हा गाभा. म्हणजे  यातही त्यांचे गृहीतक हेच की पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारी आणि न्यायालयातील खटले स्त्रियांच्या चुकांचा परिपाक आहे. पण त्या यावेळी एवढही समजून घेण्याची तयारी ठेवत नाही की आपल्या समाजात आजही सासरी होणाऱ्या अत्याचाराला सहनच करायचे असते या त्यांच्या सारख्या मानसिकतेच्या स्त्रियांची संख्या प्रचंड आहे. कोणतीही स्त्री अत्याचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर नाईलाजाने पोलीस ठाण्याचा पर्याय निवडते. अनेक स्त्रीयातर हा पर्याय देखील निवडत नाही. अशा स्थितीत अत्याचार करणाऱ्यांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्यांऐवजी पीडितांनाच नसलेले सल्ले देणे म्हणजे त्यांच्या भाषेत माणूसपणाच्या नावावर कलंक आहे. हे असं करणं म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचा इतिहास व वर्तमान हेतुपुरस्कर विसरायचा आणि काहीतरी वेगळाच सांगत दिशाभूल करण्याचा हा प्रकार होय.

तिर्थकरांना नाते परस्पर समजुतीने समृद्ध करण्याच्या दीर्घ प्रक्रियेशी काही देणे नसल्यासारखे फक्त एकाने तडजोड करावी अशीच त्यांची मांडणी आहे. त्यांच्या भाषणांना   मिळणारा प्रतिसाद या व्यवस्थेच्या लाभार्त्यांकडून व काहीसा स्वतःचे ठोस मत बनवू न शकलेल्या काठावर बसलेल्यांकडून येत आहे. मी जेव्हा एकदा त्यांचे भाषण ऐकायला गेलो होतो, त्यावेळी मी अनुभवले की अनेक पुरुष आपल्या घरातील मुलींना व महिलांना अगदी आग्रहाने (जबरदस्तीने) घेऊन आलेआईने मुलीला सासरी जाताना दिलेले सल्ले वजा उपदेश असलेली पोस्ट ही अपर्णा रामतीर्थकर यांच्या भाषणाने प्रभावित आहे. स्त्री शिक्षणाचा जोरदार विरोध करणाऱ्या या कथित समाजसेविकांचा विरोधाभास हा की त्यांनी स्वतः वकिलीचे शिक्षण घेतले आहेत आणि तरिही मुलींच्या शिक्षणाला विरोध करुन त्या स्वतःतीलच दांभिकपणा दाखवत आहेत.

या पोस्टची सुरुवात ज्या पद्धतीने केली आहे त्यामुळे अनेकदा पीडित भूमिकेत असलेल्या प्रत्येकाला पोस्टची सुरुवात वाचून तो विचार पटतो. कारण प्रत्येकाचे स्वतःचे म्हणून काही अनुभव असू शकतात, मात्र कधी कधी अशा व्यक्तींना आपले अनुभव हे सार्वत्रिक असल्याचाही गैरसमज होतो. त्यातूनच मग अशा मांडणीवर विश्वास ठेवायला सुरुवात होते. खरंतर प्रत्येकाने प्रत्येकाशी प्रेमाने, समजूतदारपणे वागावे हे शाश्वत आणि वैश्विक मूल्य आहे, पण जेव्हा हे वागणं फक्त महिलांवर बंधनकारक करत पुरुषांना यातून सूट दिली जाते, तेव्हा त्यातून सोयीस्करपणे आणि कदाचित नियोजनबद्ध पद्धतीने पुरुषप्रधान संस्कृतीला पाठबळ देण्याचा प्रयत्न होतो.

सध्या पालक आणि पाल्य या नात्यात पिढीतील अंतर आणि त्यांच्या अनुभव विश्वांमध्ये गतीने होत असलेल्या बदलांच्या पार्श्वभुमीवर एक विचार (मार्गदर्शक दिशा) सांगितला जातो. तो म्हणजे पाल्यांचे दिशादर्शक (मार्गदर्शक) व्हा, त्यांचे नियंत्रक होऊ नका. या तत्वाचा विचार केला की मग साचेबद्ध उत्तर न देता त्यावर आपला दृष्टिकोन शांतपणे आणि संयमाने ठेवा आणि अट्टाहास न करता तो दृष्टीकोन स्वीकारायचा की नाही हा निर्णय समोरच्या व्यक्तीला घेऊ द्यात हा दृष्टिकोन मिळतो. मात्र या पोस्टमध्ये अपर्णा रामतिर्थकर अगदी साचेबद्ध आणि सर्व आजारांचा रामबाण उपाय अशा जाहिराती थाटात सुनेने (स्त्रीने) कसे वागावे असा उपदेश देत आहेत. जे आक्षेपार्ह आणि चुकीचे आहे, असे मला वाटते. त्यामुळे अशा स्वरूपाच्या साचेबद्ध आणि सगळ्या प्रश्नांचे उत्तर एकच सांगणाऱ्या लिंगभेदी पोस्टवर गांभीर्याने विचार करुन या पोस्ट सकारण नाकारायला हव्यात.

मुलीला तिचं घर कोणतं हा उपदेश देत या पोस्टची सुरुवात होते. हे सांगताना लिहिणाऱ्याच्या विचारप्रणालीत पुरुषप्रधानतेची बीजं किती खोलवर रुजली आहेत याचं स्पष्टपणे दर्शन होतं. कोणत्याही माणसाला (स्त्री-पुरुष) आपले लहानपण जेथे गेले त्या जागेशी काही जैविक व भावनिक नाते असते. ते सोडून जाण्याची भावना काय असते हे कदाचित आपल्याला विस्थापितांच्या अनुभवातूनही समजू शकेल. पण आयुष्याच्या एक महत्वाच्या टप्प्यावर अशापद्धतीने स्वतःचं मूळ सोडून दुसऱ्या ठिकाणी जाताना मानसिकपातळीवर काय घालमेल होते हे देखील समजून घेणं आवश्यक ठरते. ज्यावेळी मुलींना आपण जेथे लहानाचे मोठे झालो, ज्या माणसांनी आपल्याला जीवापाड प्रेम करत मोठे केले असे आपले माहेरचे ठिकाण आपले नाहीच असे सांगण्याचा प्रयत्न होतो तेव्हा हा फारच क्रूर आणि स्वार्थीपणाचा मानवी व्यवहार म्हणावा लागेल. यातील स्वार्थीपणा हा पुरुषसत्ताक व्यवस्थेचे समर्थन करणारा व त्याला अधिक बळकटी देणारा असतो.

पुरुषप्रधान संस्कृतीत मुलीने स्वतःचं घर सोडून सासरी जाणे हे अपेक्षित असते आणि त्याबद्दल कुणालाही काहीही घेणेदेणे नसते, त्यामुळे संवेदनशीलपणे ते संक्रमण समजून घेण्याचीही तसदी कोणाकडून दाखवली जात नाही. त्यामुळे सासर हेच यापुढे तुझे स्वतःचे घर आहे आणि यापुढे तु आमच्या घरी पाहुणी म्हणुन आहेस, त्यामुळे यापुढे आमच्याशी वागताना पाहुण्यासारखीच वाग, असे सांगणे. तसेच यापुढे जाऊन आता लग्न होऊन ज्या घरी जाते आहेस तेथेच तुझं मरण झालं पाहिजे. जगली तरी सासरी आणि मेलीस तरी सासरी हा जाणीवपूर्वक संस्कार (propoganda) रुजवला जातो. याला माझा व्यक्तिगत विरोध आहे.

मालिका बघण्याबाबत माझे व्यक्तिगत काही आक्षेप आहेत, पण हे आक्षेप रामतीर्थकर यांच्या सारख्या एकेरी हाक मारू नये छाप अर्थहीन आक्षेपांसारखे नाही. कारण अनेकवचनी हाक मारल्यावर अगदी माणुसपणाचे सर्व संस्कार होतात हा माझा भ्रम नाही आणि ज्यांचा आहे त्यांनी तो दुरुस्त करावा असेच माझे स्पष्ट मत आहे. त्याचं कारण हा एकेरीपणा एकमेकांच्या विश्वासातून आणि मैत्रीपूर्ण नात्यातून येतो. आणि हा टप्पा कथित सन्मानाच्या नाटकी वागण्यापेक्षा खूप महत्त्वाचा आहे. जेथे प्रत्येकजण वयाचे दडपण न घेता व्यक्त होतो. त्या व्यक्त होण्यात प्रचंड प्रेम आणि आदर असतो, जो नाटकी अथवा सामाजिक दाबावातून न येता मनातून आलेला असतो. याचं उदाहरण द्यायचं ठरलं तर तिर्थकरांना पटेल असं आईचं उदाहरण आहेच. त्यांनी त्यावर विचार करावाच.

जॉब-करीअर या महत्वाच्या गोष्टींना फालतु म्हणणे म्हणजे टोकच झाले. त्यापुढे जाऊन पैसा कमविण्यासाठी घराचा उंबरठा न ओलांडण्याचा सल्ला म्हणजे वास्तव नाकारत स्वतःच्याच कोशात राहणे आहे. आज पैसे ही आयुष्यातील सर्वस्व नसली तरी जगण्यासाठी (महिलांसाठी तर सन्मानाने जगण्यासाठी) अत्यावश्यक बाब झाली आहे. त्यामुळे नोकरी, पैसे याचं किमान महत्वही नाकारणे हा शुद्ध मूर्खपणा आहे.

तिर्थकरांचं महत्वाचं वेगळेपण म्हणजे त्या ज्या पिढीचे प्रतिनिधित्व करतात त्यातून त्या अजूनही बाहेर पडलेल्या नाहीत. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्यांना त्यांच्या नवऱ्याने कधीही प्रेमाने बाहेर फिरायला जायचे का असे विचारले नाही. त्यामुळे तसे विचारुच नये असा आट्टाहास त्या करतात. दैनंदिन जगण्यात काही नाविन्य शोधत जगण्याचा आनंद घेण्याशी या वकिल बाईंचा दुरान्वये देखील संबंध न आल्याने हे असे होत असावे असे मला वाटते.

'लग्नाच्या वरातीत भर रस्त्यावर चारचौघात नाचु नकोस, त्यामुळे माहेरच्या नावाला काळिमा लागेल', हा तर गमतीशीरच सल्ला. हा सल्ला देण्यामागे नाचणे (नृत्य) वाईट असते, त्यात चारचौघात नाचणे तर जास्त वाईट अशी काही गृहीतके असल्याचे लक्षात येते आणि त्यांची नृत्याविषयीची संकुचित समज व दृष्टिकोनही कळतो. पण यासर्वात त्या दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या आपल्या वंशाच्या दिव्याबद्दल मात्र काहीही आक्षेप घेत नाही. दुसरीकडे घरातल्याच लग्नाच्या वेळी महिलांनी गाण्यावर नाचणे म्हणजे यांना माहेरच्या नावाला काळिमा फासणे वाटते. काय काय केल्यावर आईच्या, वडिलांच्या व माहेरच्या नावाला काळिमा फासला जातो याबद्दलची तिर्थकरांची यादी तशी मोठी आहे. एकूणच संस्कृती रक्षण आणि कुटुंब बचावच्या बेगडी कामात त्यांना या यादीचा काहीसा फायदा होईलही, पण उत्क्रांतीच्या टप्प्यावर त्यांची ही यादी त्यांच्यातील उत्क्रांतीचा अभावच अधोरेखित करते.

"घराबाहेर पडताना लेगिन, जिन्स, टी-शर्ट असे कपडे वापरणं बंद कर व तसे कपडे घालुन फिरण्याचा अट्टाहास करु नकोस", असाही सल्ला त्या देतात. त्यांच्या मते यामुळेही कदाचित संस्कृती व कुटुंब धोक्यात आले असावे , त्यामुळे अशा सल्ल्यांवर येणारी पिढी हसण्यापलिकडे काही करेल असे वाटत नाही.

तिर्थकर यांच्या म्हणण्यानुसार अशा गोष्टी जर प्रत्येक आईने आपापल्या मुलीला मनापासून शिकवायला सुरुवात केली, तर कोर्टात व पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या पती-पत्नींमधील खटल्यांची व तक्रारींची संख्या कमी होईल. एकूणच त्यांच्या मांडणीचा हा गाभा. म्हणजे यातही त्यांचे गृहीतक हेच की पोलीस ठाण्यात दाखल होणाऱ्या तक्रारी आणि न्यायालयातील खटले स्त्रियांच्या चुकांचा परिपाक आहे. पण त्या यावेळी एवढही समजून घेण्याची तयारी ठेवत नाही की आपल्या समाजात आजही सासरी होणाऱ्या अत्याचाराला सहनच करायचे असते या त्यांच्या सारख्या मानसिकतेच्या स्त्रियांची संख्या प्रचंड आहे. कोणतीही स्त्री अत्याचाराच्या अगदी शेवटच्या टप्प्यावर नाईलाजाने पोलीस ठाण्याचा पर्याय निवडते. अनेक स्त्रीयातर हा पर्याय देखील निवडत नाही. अशा स्थितीत अत्याचार करणाऱ्यांच्या सुधारणेसाठी प्रयत्न करणाऱ्यांऐवजी पीडितांनाच नसलेले सल्ले देणे म्हणजे त्यांच्या भाषेत माणूसपणाच्या नावावर कलंक आहे. हे असं करणं म्हणजे कौटुंबिक हिंसाचाराचा इतिहास व वर्तमान हेतुपुरस्कर विसरायचा आणि काहीतरी वेगळाच सांगत दिशाभूल करण्याचा हा प्रकार होय.

तिर्थकरांना नाते परस्पर समजुतीने समृद्ध करण्याच्या दीर्घ प्रक्रियेशी काही देणे नसल्यासारखे फक्त एकाने तडजोड करावी अशीच त्यांची मांडणी आहे. त्यांच्या भाषणांना मिळणारा प्रतिसाद या व्यवस्थेच्या लाभार्त्यांकडून व काहीसा स्वतःचे ठोस मत बनवू न शकलेल्या काठावर बसलेल्यांकडून येत आहे. मी जेव्हा एकदा त्यांचे भाषण ऐकायला गेलो होतो, त्यावेळी मी अनुभवले की अनेक पुरुष आपल्या घरातील मुलींना व महिलांना अगदी आग्रहाने (जबरदस्तीने) घेऊन आले होते. यात त्यांचा विचार त्यांची मळलेली वाट पुनर्जीवित करणे हाच होता. त्यामुळे बदलाच्या वाटेवर जन्माला आलेली ही पिढी हे स्वीकारायला तयार होत नाही आणि त्यांच्या आधीची पिढी हे सर्व त्यांच्या गळी उतरवण्याचा अट्टाहास करत राहते असा हा संघर्ष सध्या सुरू असल्याचे चित्र आहे.

( तिर्थकर यांच्या भाषणांबद्दल देखील अनेक आक्षेप आहेत, तेही लवकरच नोंदवेल.)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा